आझादीचा अमृत महोत्सव – सेवेचा संकल्प
१५ ऑगस्ट २०२५, स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी धाराशिवच्या आकाशात तिरंगा फडकला, आणि प्रत्येक हृदय अभिमानाने, भक्तीने उजळून निघाले. स्वातंत्र्यदिन हा केवळ बलिदानांचा स्मरणोत्सव नाही, तर राष्ट्रसेवेच्या नव्या संकल्पांचा दिवस आहे. आज या दिवसाने केवळ देशवासियांनाच नाही तर सौ. कमल सागर चव्हाण यांनाही नवी शक्ती दिली.